आजचं युग
हे स्पर्धेचं युग म्हणून ओळखलं जातं. ही स्पर्धा जर निकोप असेल तर नक्कीच विद्यार्थ्याच्या विकासास पोषक ठरते.
आपण जाणताच की, कुठलंही क्षेत्र असो, सरकारी अथवा खाजगी, वैद्यकीय अथवा
अभियांत्रिकी - स्पर्धा परीक्षांना आता पर्याय नाही. योग्य उमेदवार निवडण्याचे ते महत्त्वाचे साधन ठरते.
त्यामुळे
आता हे आवश्यक झालं आहे की, या स्पर्धा परीक्षांची ओळख आणि सराव हा प्राथमिक
शाळेपासूनच सुरु व्हायला हवा. अशीच शालेय जीवनातील एक महत्त्वाची स्पर्धा परीक्षा म्हणजे जवाहर
नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा होय.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या उद्देशाने ही
विदयालये केंद्र शासनामार्फत कार्यान्वित आहेत.
कुठल्याही
स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणे म्हणजे एक दिव्यचं,नाही का? हे साध्य करण्यासाठी
आवश्यक असतो तो सराव , योग्य मार्गदर्शन आणि यश मिळविण्याची दृढ इच्छा. आपल्या
मोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चिमुकल्यांनी हे साध्य करून दाखवलंय . चला तर मग ह्या
सर्वांचं अभिनंदन करूया !!!!!
१ |
रोहन मंगेशराव
चरडे |
जिल्हा परिषद
उच्च प्राथमिक शाळा (मुले),नेरपिंगळाई |
२ |
कु.संचिता राहुल
मोहोकर |
जिल्हा परिषद
उच्च प्राथमिक शाळा (मुली),नेरपिंगळाई |
३ |
राज ज्ञानेश्वर
धुर्वे |
जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा, खेड |
खाजगी
व्यवस्थापनाच्या शाळांतील १० विद्यार्थ्यांची
या प्रवेश परीक्षेतून निवड झाली
आहे.
शिक्षण विभाग
पंचायत समिती मोर्शी तर्फे निवड
झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि
त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक बंधू
/भगिनी ह्यांचे खूप खूप अभिनंदन !!!! विद्यार्थ्यांच्या भविष्यातील
पुढील वाटचालीस अनंत
शुभेच्छा.
1 comment:
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Post a Comment