केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार
दुष्काळग्रस्त भागात सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविणे
बंधनकारक असल्याचे मा.शिक्षण संचालक (प्राथ) महाराष्ट्र राज्य पुणे
यांचे पत्र क्र.जाक्र. प्राशिस/शापोआ/२०१९/
दुष्काळ/३०२/११३२ दि/ १५/०५/२०१९ या पत्रात नमूद आहे. महसूल व वन विभाग शा.नि. क्र. एससीवाय
२०१८/प्रक्र८९/म-७/दि.३०/१०/२०१८ नुसार मोर्शी
तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. करिता मोर्शी
तालुक्यातील सर्व गावांमध्ये शालेय पोषण आहाराचा पुरवठा करावा लागेल. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शा.नि.शापोआ-२०१६
प्रक्र.२६२/एस डी ३/मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय,मुंबई
दि.२९/०५/२०१७ या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार
दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांना आठवड्यातील तीन दिवस दुध/ अंडी / फळे
असा पौष्टिक आहार द्यावयाचा आहे.
कुठलाही विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहणार
नाही याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी.या बाबत संदर्भ यापूर्वीच
या कार्यालयाद्वारे पत्राद्वारेसूचना देण्यात आलेल्या आहेत. पोषण आहाराकरिता विद्यार्थी शाळेत
यावेत याकरिता शाळांनी योग्य ते नियाजन करावे व सुट्टीतही पोषण आहार मिळत
असल्याबाबत गावात अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी जेणेकरून विद्यार्थी शाळेत येतील.
केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील शापोआ पात्र सर्व
शाळांना भेटी देऊन याबाबत आढावा घ्यावा व याबाबत या कार्यालयास अहवाल सादर करावा.
-स्वा-
गटशिक्षणाधिकारी
पं.स.मोर्शी
No comments:
Post a Comment