इयत्ता १० वी व १२ वी च्या पुनर्परीक्षार्थ्यांना अनेक शुभेच्छांसह........
इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी ची फेरपरीक्षा दि .१७ जुलै ते ०३ ऑगस्ट २०१९ च्या दरम्यान होत आहे.या परीक्षेला आपल्या मोर्शी तालुक्यातून अनुक्रमे ४५३ व २३९ विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत .या सर्व विद्यार्थी मित्रांना अनेक शुभेच्छा ....
विद्यार्थी मित्रांनो, १० वी किंवा १२ वी त अपयश आलं ,म्हणजे पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं वाटत की,आपलं शैक्षणिक करिअर संपल. जणूकाही १० वी व १२ वीची परीक्षाच आयुष्याच्या यशाचं परिमाण होय.पण या संदर्भात एक वेगळीच कथा लिहून ठेवलीय आहे ती मुंबईचे अपर पोलीस आयुक्त डॉ.मनोजकुमार शर्मा ह्यांनी. वर्ग ९ ते ११ वी पर्यंत तृतीय श्रेणीत कसेबसे उत्तीर्ण होणारा व इयत्ता १२ वी त नापास होणारा हा तरूण जिद्द आणि मेहनतीच्या भरवश्यावर आज प्रशासकीय सेवेत उच्च पदी विराजमान आहे .या तरुणाने शिक्षणासाठी पैसा उभा करतांना कुठलही काम केल, अगदी श्रीमंतांच्या घरची कुत्री सुद्धा फिरवून आणली.
तेव्हा, मित्रांनो अपयशाने खचून न जाता यशासाठी सतत संघर्ष करणे हेच यशस्वी जीवनाचे सूत्र आहे.एक युद्ध हरलो म्हणून जीवनाची लढाई हरलो असे होत नाही, हो .....ना?
कोशिश के बावजूद हो जाती है कभी हार
होके निराश मत बैठ यार
बढते रहना आगे, हो जैसा भी मौसम
पा लेती है मंजिल चिटी भी, गिर कर कई बार ..........
पुनश्च आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा .... 📖📖📖📖
No comments:
Post a Comment