Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

१.शिरजगाव कसबा पाणीदार बनवायचं

श्री.रोहित पोकळे, विशेष शिक्षक, गटसाधन केंद्र,प.स.मोर्शी यांचे प्रेरणादायी सामाजिक कार्य 

 शिरजगाव कसबा पाणीदार बनवायचं.💧💧

         शिरजगाव कसबा या गावातील पाण्याची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे, गावातील तसेच शेतातील सर्व विहीरी, बोरवेल पूर्णतः आटू लागले आहे, त्यामुळे गावातील सर्व गावकऱ्यांना व युवा पिढी या सर्वांना पाण्याची समस्या भेडसावू लागली. जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच गावातील 90 टक्के ओलिताखालील क्षेत्र कोरडवाहू होण्याची भीती अशा अनेक पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या. पण समस्येतून बाहेर निघण्यासाठी एकही पुढे यायला तयार नव्हता यावर तोडगा म्हणून श्री. रोहित पोकळे यांनी गावातील सर्व तरुण मंडळींचा  एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला त्यातून सर्व तरुण मंडळी वैयक्तीक आपल्या पाण्याबाबत च्या समस्या त्या ग्रुपमध्ये मांडू लागले, त्या एका ग्रुपचे एका मोठ्या समितीमध्ये त्याचे परिवर्तन झाले, त्यातूनच सर्व गाव एकत्र आले मग निर्णय झाला की, गावातील नदी नाले खोलीकरण करायचे, शेतामध्ये शेततळे विहीर पुनर्भरण करायचे यामुळे गावातील तसेच शेतातील पाण्याची पातळी वाढेल यातून एक समिती स्थापन करण्यात आली समितीमध्ये सर्व गावकरी काम करू लागले वॉर्डा- वॉर्डा मध्ये प्रोजेक्टर लावून मीटिंग सुरू झाल्या आणि गावांतील लोकांची जनजागृती करत सोबतच लोकवर्गणी जमा करणे सुरू झाले आणि अशी एकूण दहा लक्ष रुपये जमा झाले. मग महाश्रमदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री उमेश खोडके तहसीलदार चां.बाजार, उद्घाटक मा.श्री संदीप कुमार अपार साहेब उपविभागीय अधिकारी अचलपुर,
मा.श्री.दातीर साहेब,मा.श्री सातपुते साहेब,मा.श्री निर्भय जैन साहेब,मा श्री.शिंदे साहेब,मा श्री अशोक कांबळे साहेब,मा श्री अविनाश बदूकले यांना 9 मे 2019 रोजी आमंत्रित करण्यात आले नंतर श्रमदानाचा कार्यक्रम घेऊन नदी खोलीकरण व नदीमध्ये चर पाडणे सुरू केले, यानंतर नदीमध्ये जेसीबी पोकलांड लावून नदीमध्ये खोलीकरण करणे सुरू आहे, गावामध्ये छतावरचे पाणी विहिरीमध्ये मुरवण्यासाठी सुद्धा कार्यक्रम हाती घेतला आहे, गावामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या दुर्गा व गणपतीच्या मुर्त्या नदीमध्ये शिरण्यास बंदी केलेली आहे तसेच गावातील ई वर्ग जमिनीवर गावतळे घेणे तसेच गावाच्या आजूबाजूला असणारे तलाव गाळमुक्त करणे जेणेकरून जमिनीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाणी मुरेल हे सर्व कामे तांत्रिक दृष्ट्या बरोबर लक्ष देऊन म्हणजेच वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे इंजिनीयर यांना दाखवून जास्तीत जास्त फायदा  कसा होईल अशा पद्धतीने सर्व गाव एकत्र येऊन पाणी आडवा पाणी वाचवा या मोहिमेअंतर्गत सर्व गाव पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मदत करत आहे.नंतर जिल्हाधिकारी साहेब माननीय श्री शैलेशजी नवाल साहेब यांनी सुद्धा सायंकाळी 07.30 ला उशीरा का होईना कर्यक्रमाला भेट दिली.अशा पद्धतीने माझं गाव विकास समिती शिरजगाव कसबा या समिती अंतर्गत सर्व गाव एकत्र येऊन पाण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करत आहे.


2 comments:

Unknown said...

Good Job
Keep it up

Nitin Patil Jalgaon said...

Good Job
Keep it up